*आयुष्य रिवाइंड झाले*
निसर्गाने किमया केली
माणसे ३० वर्षे मागे गेली..
रियालिटी शोज झाले बंद
महाभारत रामायण सुरू झाले...
आठवून आपले पुन्हा छंद
कुटुंब सारे एकत्र आले...
मॅक डी, पिझ्झा, डाॅमिनोज
गेले सगळे बर्गर उडत...
पॏष्टीक पदार्थ बनतात घरी
चायनिज ने नाही अडत....
हळदीच्या दुधाने घेतली
कोल्ड्रींकची जागा हेरून...
सर्व मिळून स्वयंपाक बनतो
सबवे पण येत नाही बाहेरून.
गप्पा करताहेत सर्वजण
कॅरम सापशिडी खेळताना..
मोबाईलही नको वाटतो
परत नाळ जुळताना...
सांध्य-सकाळी जेवणं
एकत्र होऊ लागलीत...
मोलकरणी ला सुट्टी देऊन
साफसफाई करू लागलीत...
आळशीपणाच्या कळसाने
हातपाय धुणे झालेहोते बंद..
विदेशी शेकहऀडचा आम्हाला
फार लागला होता छंद..
प्रदुषण थोडे झाले कमी
धकाधकीला ब्रेक लागले...
पाळणाघरातल्या चिमण्यांना
आई-बाबा मिळू लागले...
शहरांकडे धावणा-यांना
ओढ लागली गावाची...
विज्ञानाच्या युगातही
आळवणी होत आहे देवाची..
शेकहऀड करणारे हात आता
नमस्कार करायला लागले...
निसर्गाने केली किमया अन्
*आयुष्य रिवाइंड झाले*
************
💐💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment